Wednesday, 24 December 2025
तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे शिंगाडे हे असे एक फळ आहे की आरोग्याचे अनेक बिमार्यापासून संरक्षण करणारे आहे. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स प्रोटीन आहेत ज्यामुळे अनंत बिमाऱ्यासोबत लढण्याची ताकद देतात. त्यामुळे तरुण पण देखील चिरकाल टिकून राहू शकते एवढी ताकद या शिंगाड्या फळांमध्ये आहे शिंगाडे हे विशिष्ट रूतमध्येच येतात विशेषतः हिवाळ्यामध्ये तळ्याच्या काठी मोठा वेल या फळाचा येतो यावेळीला फळे शिंगाडे लागतात हिरवेगार असतात नंतर त्याला शिजविले की काळे होतात त्यामुळे अवश्य शिंगाडे हे या ऋतूमध्ये खावे
Tuesday, 23 December 2025
कच्चे मीठ खाणे आरोग्यास हानिकारक
दैनंदिन जीवन धकाधकीचे आणि पळापळीच्या आहे. अशा परिस्थितीत व्यक्ती खाण्याबाबत जागरूक राहत नाही त्यामुळे अनेक बिमाऱ्या या जळतात ज्या जीवनभर सोडत नाही त्यामुळे जीवन समस्या लोकांनी वेढले जाते या समस्येवर महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे कच्चे मीठ खाऊ नये तसेच बाहेरील पदार्थ देखील खाऊ नये यामध्ये लोणचं हे खूप हानिकारक आहे लोणचं मोठ्या प्रमाणात कच्च्या मिठने बनते याचा सर्वात मोठा परिणाम शरीरावर होतो कच्चे मीठ हे आरोग्य खूप हानिकारक असते त्यामुळे लोक बपी शुगर हृदयरोग अशा अनेक गंभीर बिमारी होऊ शकतात त्यामुळे कधीही भाजी योग्य नीट टाकून शिजवलेले खावे त्यामुळे आरोग्य हे चांगले उत्तम राहते भाजीत एकदा मीठ टाकल्यानंतर जेवताना कधीही वरून कच्ची नीट टाकू नये यामुळे हाडे सुद्धा दिसून बनतात
मुळगा ही वनस्पती किडनीसाठी उपयुक्त
आज कालच्या दैनंदिन जीवनामध्ये मनुष्य हा कामात व्यस्त आहे त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे जे मिळेल ते फूड म्हणू शकत असल्यामुळे किडनीच्या अनेक समस्या या दिवसेंदिवस निर्माण होताना दिसून येतात किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपन दररोज जेवणामध्ये जर मुलगा य वनस्पतीचे सेवन केलं तर आपली किडनी ही शुद्ध होत असते त्यामुळे येणाऱ्या रोगापासून मुक्त होण्यासाठी या वनस्पतीचे सेवन करणे गरजेचे आहे मुलगा ही आपली किडनी मजबूत बनवते शुद्ध करते त्यामुळेही गुणकारी औषध आहे.
Saturday, 20 December 2025
पानफुटी ही आयुर्वेदिक औषध
पानफुटी ही पोटावरील अनेक रोगावर उपयुक्त अशी वनस्पती आहे कोणत्याही प्रकारचे पोट दुखले तर त्यावर गुणकारी औषध म्हणून ही पानफुटी वापरली जाते विविध रोगावर गुणकारी औषध म्हणून पानफुटी ही ओळखली जाते या वनस्पतीची एक पान जर प्राशन केले तर पोटातील रोग नष्ट होण्यास सुरुवात होते
Wednesday, 17 December 2025
काटशेवरी चे झाड गर्भपिशवी कॅन्सरवर उपयुक्त प्रा . संतोष गोपीचंद पवार
किनवट परिसरात निसर्गरम्य जंगल आहे. येथे पैनगंगा अभयारण्य टिटवी अभयारण्य आहे विविध वन औषधींनी हे जंगल व्यापलेले आहे. अनेक व नवसिद्धीपैकी एक वन औषध म्हणजे काठ शेवरी चे झाड हे झाड आजच्या आधुनिक युगात वाढत चाललेल्या स्त्रियांच्या गर्भ पिशवी कॅन्सरवरील उपयुक्त असे वन औषध आहे. योग्य पद्धतीने हे औषध जर महिलांना एक महिना दिले तर गर्भपिशवीचा कॅन्सर दूर होऊ शकतो.
Monday, 8 December 2025
काळे मिरे शुगर हृदयरोग व कर्करोगासाठी उपयुक्त औषध प्रा.संतोष गोपीचंद पवार
आजच्या धकाधकी जीवनामध्ये मनुष्य केमिकल युक्त आणि दूषित अन्न माहितीच्या अभावा मुळे खात आहे. केमिकल युक्त तेल फवारणीचे औषध मारलेले भाजीपाले गवताचे तेल म्हणजे चॉकलेट या अशा तळलेल्या बाहेरील पदार्थामुळे शुगर हृदयरोग आणि कर्करोगासारखे गंभीर रोग मनुष्याला होत आहे त्यामुळे दैनंदिन आयुष्य दुःखी आणि रोगीट होत आहे.
त्यामुळे आजची जीवनशैली ही आपण काय खातो कसे राहतो यावर आधारित आहे काही खा केमिकलच मिळणार असं म्हणून लोक मुद्दामहून काही पण खातात ते चुकीचे आहे जेवढं सांभाळून राहता येईल तेवढं सांभाळलं तर शरीर निरोगी राहू शकतात या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते तोंडामध्ये काय खायचं एक बार पोटात गेल्यावर ते बाहेर निघत नाही त्यामुळे विचार करून खायचा तरच आपलं शरीर निरोगी राहू शकते.
विज्ञान युगामध्ये विविध शोध लागत आहे या शोधा पैकीच एक महत्त्वाचा शोध म्हणजे काळे जिरे आहे या काळा जिरा चा उपयोग कसा करावा ज्यामुळे शुगर हृदयरोग आणि कर्करोग यासारखे गंभीर रोग दूर राहतील याचा वापर तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा तर याचे फायदे आपल्याला मिळतील..
Friday, 5 December 2025
प्रियदर्शनी विमानतळ राजगड प्रा संतोष गोपीचंद पवार
सन1971 ला श्रीमती इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या कै. श्री उत्तमरावजी राठोड हे खासदार होते. मराठवाड्यातील औरंगाबाद आजचे संभाजीनगर ला भेट देण्याचे नियोजित होते
मराठवाड्यात असलेले आदिवासी डोंगररागांनी व्यापलेले प्रसिद्ध ठिकाण म्हणजे किनवट या परिसराला भेट त्यांनी द्यावी असे वाटत होते त्यामुळे भेट देण्याचे त्यांचे नियोजन होते. मराठवाड्यातील दर्शन म्हणून किनवट परिसराला देखील त्यांची भेट नियोजित होती. किनवट हा परिसर सुंदर निसर्गाने नटलेला तसेच येथील आदिवासी संस्कृती ही खूप छान आहे आणि येथील नृत्य परंपरा खूप महान आहे त्यासाठी बघण्याकरिता हे नियोजन होते या कारणाने राजगड हे भौगोलिक दृष्टिकोनातून एक चांगले ठिकाण आहे
जे विमानतळ साठी योग्य आहे इंदिरा गांधींचे विमान हे योग्यरीत्या लँडिंग हवे यासाठी ते नियोजन होते. परंत श्रीमती इंदिरा गांधींचा हा दौरा रद्द झाला. त्यामुळे विमान स्थळ निर्मितीचे कार्य अपूर्ण राहिले.
यानंतर या विमानतळाकडे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दिले या हेलिपॅड चा येथे योग्य पद्धतीने विकास व्हावा यावर त्यांनी भर दिला त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला डिमांड ठेवण्यात आले होते.
किनवट रेल्वे ऐतिहासिक विकास समस्या अणि उपाय:-प्रा.सतोष गोपीचंद पवार
सन 1947 वर्षी किनवट रेल्वेची सुरुवात झाली हा मार्ग तयार झाला या मार्गाचे काम 1932 पासून सुरू झाले होते.सन1967 ला किनवट स्टेशनची निर्मिती झाली पूर्वी जंगलामध्ये हे स्टेशन मोकळी जागा होती.सन2005 ला किनवट रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये या रेल्वे मार्ग ची उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री श्री लालूप्रसाद यादव हे किनवट येथे आले होते.
ब्रॉडगे झाल्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढ झाली कृष्णा एक्सप्रेस ही तिरुपतीला तर नंदिग्राम ही मुंबईला ,अकोला पॅसेंजर,,सत्रागाछी यागाडया सोडण्यात आल्या पण पुरेशा नाहीत.
प्रवासी वेळेवर गेले तर मोठ्या शहरातील कामे होतील..अथिक गाड्या सोडण्यातची गरज आहे.
महीला सुरक्षा होन गरजेचे आहे..
व्यापारासाठी गोदामांची निर्मिती करणे गरजेचे आहे
तसेच स्वच्छता , प्रवासी मुक्कामाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे
. पिण्याचे शुद्ध पाणी रेल्वे पोलीस करणे ची अधिक व्यवस्था दळणवळणाची अधिक व्यवस्था रेल्वे पोस्ट निर्माण करणे
Thursday, 4 December 2025
Saturday, 29 November 2025
माऊली मुंगसाजी महाराजांचे जीवन: एक प्रेरणादायी शिकवण प्रा संतोष गोपीचंद पवार
भगवान मुंगसाजी महाराज विदर्भाच्या मातीत जन्मलेले एक चमत्कारिक व समाजसुधारक संत होते. त्यांचे जीवन अध्यात्म समाजसेवा परोपकार यामध्ये गेलेले आहे.. साधेपणा ,भक्ती सत्य निष्ष्टवान लोकांच्या दु:खानात स्पर्श करूनमानसिक आणि भावनिक त्यांचा आधार बनत होते. त्यांच्या प्रवचनातून श्रद्धा सकारात्मकता व संयम यांचा प्रभावी संदेश मिळतो.
महाराज यांचा जन्म 5 सप्टेंबर 1863 रोजी शुक्रवार या दिवशी आंध कुळा मध्ये झाला.धामणगाव हे दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ मध्ये आहे..
वडिलांचे नाव विक्रम व आईचे नाव गमाई असे होते. आजोबाचे नाव भोपाजी व आजीचे नाव साखराबाई होते. मुंगसाजी माऊली यांचे घराणे आजोबाच्या काळापासूनच श्रीमंत होते ते सर्व समाजातील कर्ज व गरीब माणसांना नेहमी मदत करत अन्नदान हे तर त्या घराण्याचे आवडते कार्य होत हीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली होती. अशातच या कुटुंबाला गरिबीचे दिवस केव्हा आले पत्ताही लागला नाही त्यामुळे मुंगसाजी महाराजांना गावातील व आपसातील काही व्यक्तीने त्रास देण्यास सुरुवात केली.
परंपरेने मुंगसाजी महाराजांकडे गावचीपाटीलकी आली होती पण काही व्यक्तींनी त्यास विरोध केला.
अशा परिस्थितीमध्ये मुंगसाजी महाराज यांनी आपल्या मालकीच्या गढी मध्ये बारा वर्षे एकाच ठिकाणी तपस्या केली विसाव्या वर्षीपासून बारा वर्षे सलग त्यांनी तप केले. तपामुळे मांडी व पोटरी एकच झाली होती
तप पूर्ण झाल्यानंतर तपासून उठल्यावर माऊलीच्या मांडीतून खूप रक्त वाहिले धामणगाव मध्ये तपा नंतरही समाजकंटक लोकांनी त्रास दिला होता.
भुकेले असलेल्या जनतेला अन्नदान करणे
कित्येक शेतकरी मजूर सामान्य नागरिक कर्जामध्ये डुबलेले असतात त्यांना कर्जमुक्त केले
कित्येकांची लग्न जुळत नव्हते त्यांचे लग्न देखील लावून दिले .
हजारो भक्तांना त्यांनी संकल्प सिद्धीने दुःखमुक्त केले त्यामुळे त्यांना महात्मा देखील म्हणण्यात आले
त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती त्यामुळे त्यांना अनेक विद्वान लोक देखील भेटण्यास येत होते
अवतार मेहेर बाबा असेच एक संत होते त्यांनी देखील .
1940 ते 45 या दरम्यान भेटतही दिल्या तसेच बडोद्याचे राजे यशवंतराव घाडगे हे त्यांनी सन 194119 47 पर्यंत सलग सहा वर्ष महाराजांची सेवा केली.
09.021947 मध्ये भगवान मुंगसाजी माऊली यांनी यशवंत घाडगे यांना बोलाविले व त्यांच्या समवेत शेगाव मूर्तिजापूर अकोला खामगाव नाशिक व मुंबादेवी च्या यात्रेमध्ये घेऊन जाण्यास सांगितले .
भगवान मुंगसाजी माऊली सन 1947 व 1952 पर्यंत 11 वर्ष मुंबईला एका जागी राहिले होते.
माऊली एकदा मुंबईला गेल्यानंतर परत धामणगावला आले नाही त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या हजारो भक्तांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली.
मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची ही माऊलींच्या नातेवाईकांनी भेट घेतली परंतु तरीही मुंगसाजी माऊलींची भेट झाली नाही.
मुंगसाजी महाराजांच्या नातेवाईकावर व त्यांच्या भक्तावर पोलीस केस करण्यात आली.
ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध राजकीय स्वातंत्र्याचा लढा चालू होता तर दुसरीकडे मुंगसाजी महाराज सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक व राजकीय असा मानवाच्या सर्व सामाजिक बंधनात अडकलेल्या मानवास त्यातल्या त्यात सर्वात जास्त बळी पडलेल्या बहुजन समाजामध्ये जागृती करण्याचे महान कार्य केले होते.
Friday, 28 November 2025
2025 किनवट नगराध्यक्षपदी कोण निवडून येणार जाणूया जन्मताचा कल-राजकीय विश्लेषक प्रा संतोष गोपीचंद पवार
2025 च्या किनवट नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ वाढलेले आहे नागरिक सामाजिक संघटना युवक आणि व्यावसायिक यांच्यात तीव्र चर्चा होत असताना दिसून येते. शहराचा विकास ,मूलभूत सुविधा आणि प्रशासनातील गती यातील अपेक्षेमुळे लोकांकडून या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लोकांच्या प्रतिक्रिया वार्ड निहाय वातावरण आणि अनौपचारिक जनमत सर्वेक्षणाच्या आधारे एक तटस्थ अंदाजात्मक विश्लेषण या ठिकाणी देत आहे
जन सर्वेक्षण करण्यासाठी काही स्त्रोतांचा आधार घेतला
1) किनवट शहरातील दहा प्रभागात सामान्य नागरिकांशी संवाद त्यामध्ये युवक महिला व्यावसायिक व आदिवासी समाज यांचे मत तसेच सोशल मीडियावर दिसणारा चर्चेचा कल रस्त्यावरचे जनमत जाणून घेतले.
उमेदवारांची ताकद व उनिवा
सर्वेक्षणामध्ये दिसलेले दोन प्रमुख गट किंवा उमेदवार त्यांचे विश्लेषण
उमेदवार एक (कमळ)
1) पूर्वी केलेले काही महत्वपूर्ण काम नागरिकांना आठवतात. 2)शहरातील मध्यवर्ती भागात चांगला संपर्क तसेच दिन दलितांना केलेली मदत
3)महिलांचा लाडक्या बहिणीमुळे पाठिंबा
4) ओळखीचा आपल्या जवळचा असलेला माणूस जो कधीही काम करू शकतो.
उनिवा
1) पाच वर्ष अध्यक्ष पद केले पुन्हा नवीन व्यक्तीला संधी द्यावी
2) काही वार्डामध्ये विरोध वाढत आहे.
उमेदवार बी (मशाल)
ताकद
1) तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय होत असताना दिसून येते.
2) सोशल मीडिया वरती सक्रिय उपस्थित
3)सामान्य गरीब जनतेला पावसाळ्यात पूरग्रस्तांना केलेली मदत नाली बांधकाम.
4) नवीन उगवते नेतृत्व
ऊनिवा
1) प्रशासकीय अनुभव कमी असलेला.
2) सामान्य जनतेत मिसळून राहणार
किनवट चे नागरिक कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार
1) पाणीपुरवठा आणि जल व्यवस्थापन करणारा
2) रस्ते गटार व ड्रेनेजची व्यवस्था करणारा
3) किनवट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणारा
5) आदिवासी गरीब वस्तीपर्यंत जाणारा.
6) गरीब जनतेच्या सुखदुःखात साथ देणारा
संभाव्य अंदाज उपलब्ध अनौपचारिक जन सर्वे मधून कोणतीही एकतर्फी लाट दिसत नाही दोन्ही उमेदवार यामध्ये काट्याची टक्कर आहे.
काही वार्डामध्ये A हा आघाडीवर दिसत आहे तर काही भागात B चे नेटवर्क खूपच मजबूत झालेले दिसून येते. प्रत्येक वार्ड जात आपल्या ओळखीच्या अध्यक्ष मेंबर सोबत दिसून येते..
अंतिम निकाल येत्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर अवलंबून राहील
Wednesday, 26 November 2025
महात्मा जे .नागोराव प्रा. संतोष गोपीचंद पवार
किनवट हे निसर्गांनी नटलेले विविध आदिवासी संस्कृतीने भरलेले ठिकाण आहे या मातृभूमी मध्ये अनेक विविध समाज सुधारक कार्यकर्ते लढवय्ये उद्यास आले
जे नागोराव हे व्यक्तिमत्व समाजाच्या शिक्षण मुलांच्या व्यक्तिमत्व विकास सामाजिक न्याय आणि राजकीय जागृती तसेच शहराच्या दळणवळण विकासासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी निरंतर संघर्ष केला जो आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांनी केलेले कार्य किनवट परिसरातील समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहे शिक्षणाचा जीप सामाजिक समता स्वाभिमान या मूल्यांचा प्रसाद त्यांनी अखंडपणे केलेला आहे
त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त आपण त्यांचे आयुष्य कार्य आणि संघर्ष पुनश्च स्मरण तो आणि नव्या पिढीला यामुळे प्रेरणा मिळतात.
जन्म
सन 10 सप्टेंबर 1938 रोजी त्यांचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे जन्म नाव दामोदर होते.
कुटुंब
वडील किष्टना हे पटवारी होते तर आई हे परिवाराचा सांभाळ करणारी प्रेमळ घरगुती महिला होती. त्यांच्या कुटुंबात तीन बहिणी व एकुलता एक मोठा भाऊ जे नागोराव होते. एकुलता एक मुलगा असल्यामुळे नोकरी साठी बाहेर पाठविणे म्हणजे काळजावर दगड ठेवण्यासारखे होते त्यामुळे त्यांचा बाहेर नोकरीच विरोध होता.
शिक्षण.
त्यांचे प्राथमिक शिक्षण हे आदीलाबाद येथील शाळेत झाले त्यानंतर पदवीचे शिक्षण त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी घेतले त्यांचे स्वप्न पी.एस.आय. बनवण्याचे होते. त्यासाठी जबलपूर येथे प्रशिक्षण करण्यासाठी गेले .
मुलाने समाज कार्य करावे अशी त्यांच्या आई-वडिलांची अपेक्षा होती.
किनवट नगरपालिका मुख्याधिकारी
सन 1966 च्या नगरपालिका कायद्यामुळे किनवट नगरपालिका मुख्य अधिकाऱ्याचे पद निर्माण झाले .त्या पदासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्याकरिता त्यांना नऊ महिन्याच्या ट्रेनिंग साठी दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे किनवट नगरपरिषदेचे प्रथम प्रशासकीय मुख्याधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
अल्पावधीतच श्री उत्तमरावजी राठोड यांचे विश्वास पात्र मित्र बनले दोघांचा साथ हा विकासाचा हात बनला. किनवट परिसरातील मागास असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता त्यांनी शैक्षणिक संकुलांची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळीराम पाटील महाविद्यालय किनवट हे 1972 रोजी चालू केले ते पहिले सचिव बनले
संपूर्ण महाविद्यालयाची धुरा ही त्यांच्यावरच होती त्यांच्या कालखंडात महाविद्यालयाचा विकास करण्यात आला
त्यांच्या कार्यामुळे किनवट शहरांमध्ये सुव्यवस्था निर्माण झाली त्यांची कर्तुत्वाची शैली जबाबदार होती त्यामुळे आज किनवट शहरांमध्ये चौकातील रस्त्यांची रुंदी ही मोठी दिसून येते
किनवट नगराचा विकास करण्यावर त्यांचा पूर्ण भर होता
सन 1966 अधिनियमाद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या हे सत्र चालू असताना त्यांची देखील बदली झाली पण ती नंतर रद्द करण्यात आली कारण त्यांची विकासाचा प्रभाव तसा होता
किनवट परिसरातील शेतकऱ्यांना
कापूस एकाधिकार खरेदी योजना यानुसार कापसाची विक्री महाराष्ट्र येथेच करावी लागत होती पण ही खरेदी योग्य वेळेवर होत नव्हती तसेच कापसाला योग्य भाव सुद्धा मिळत नव्हता .त्यामुळे किनवट येथील शेतकरी आपले कापूस विक्री करण्यासाठी आंध्रामध्ये जात होते परंतु तेथे जाण्यासाठी महाराष्ट्र आंध्र सीमेवरील नागरिकाकडून अनेक समस्या निर्माण होत असे
याबद्दल डी वाय एस पी शृंगार बेल यांना जे नागोराव यांनी त्याबाबत आवेदन दिले.
जनतेला न्याय मिळावा यासाठी जे नागोरव यांनी किनवट तहसील समोर मोठे भाषण दिले.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झाला होता.
संपूर्ण किनवट शहर याप्रसंगी घोषणा नारे मोठ्या प्रमाणात देण्यात आले होते न्याय हक्क मिळावा यासाठी किनवटच्या नागरिकांचे हे आंदोलन होते
त्यास जे नागोराव यांचे नेतृत्व मिळाले होते अत्यंत तल्लख बुद्धीमान व्यक्तिमत्व त्यांचे होते आंदोलनात संपूर्ण तरुण वर्गाचा समावेश व शेतकरी सहभागी होते
श्री शृंगारवेल हे प्रशासकीय अधिकारी नागपूर या ठिकाणी कार्यरत होते किनवटची परिस्थिती पाहून त्यांना या ठिकाणी पाठविण्यात आले
यावेळेस त्यांच्या संरक्षणासाठी किनवटचे पीएसआय तसेच अनेक कॉन्स्टेबल तैनात होते
हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीचे हे दिवस होते 28 नोव्हेंबर1978 रात्री
साडेसात वाजताची ही वेळ होती.डी. वाय. एस. पी .शृंगारवेल हे आराम करण्यासाठी विश्रामगृहात गेले होते हे ठिकाण जुन्या नगरपालिका ठिकाणाच्या मागील बाजूस फॉरेस्ट ऑफिस जवळ होते रात्रीचा अंधार किट आणि झाडाझुडपांचा परिसर होता त्यांनी विश्रांती करते वेळेस भेटण्यास कोणालाही परवानगी देण्यास मनाई केली पण किनवट परिसरातील हा लढा तीव्र झाला होता.
न्याय मिळाल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या होत्या त्यामुळे शृंगार वेल यांना भेटण्यासाठी जे नागोराव गेले पण त्यांचे भेटणे झाले नाही. दुसरीकडे कडाक्याची थंडी असल्यामुळे कापसाच्या ढिगार्याजवळ शेकोटी करून अनेक व्यक्ती बसले होते
र. पुढे या शेकोटीचे रूपांतरण मोठ्या आगीत झाले विषमगृहाकडे जाण्यासाठी एकच मार्ग होता तो देखील किर अंधाराचा आणि झाडाझुडपांचा होता.
हे आंदोलन शमविण्यासाठी सुरुवातीला सौम्य लाठी चार्ज चा आदेश दिला
त्यामुळे नगरपालिका परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले यावेळेस नगरपालिका श्री मधुकर वट्टमवार हे अध्यक्ष होते सर्वत्र धावपळ सुरू झाली एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले
अशा परिस्थितीतच अचानक गोळीबार देखील चालू झाला या गोळीबारामध्ये तिघांना गोळ्या लागल्या.
त्यामध्ये बाबूलल भंडारेव हा ट्रॅक्टर वाहक
यांना प्रथम गोळी लागली दुसरी गोळी सातव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलगा म्हणजे साबीर खैरूदिनखान यांच्या कमरीला बंदुकीचीगोळी लागली ते रक्तबंबाळ झाले होते त्यांना वाचविण्यास हा प्रयत्न जे नागोराव यांनी केला पण हे कार्य करताना दरवाज्याच्या फटी मधून डायरेक्ट त्यांच्या हृदयात गोळी लागली त्यामुळे ते जागीच धारातीर्थी पडले.
नागोराव यांचे कार्य आणि क्षेत्रांमध्ये ठळकपणे दिसून येते
1) व्यक्तिमत्व शिक्षण आणि स्वाभिमान जागृती,
2) किनवट परिसरातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे 3)शिक्षण हे केवळ रोजगार निर्मितीसाठी साधन त्यांनी मांडली नाही तर जीवन जगण्याची साधन मानले
4) समाजातील अन्याय कर्ज जात मध्ये सवन भेदभाव अंधश्रद्धा
5) किनवट परिसरात असलेल्या आदिवासी गावांमध्ये समता सहकार्य स्वच्छता व आरोग्य यांचा त्यांनी नेहमी संदेश पोहोचविला
6) या परिसरातील आन गोंड कोलाम प्रधान आंध्रा बंजारा वेलमा समाजातील 17 पगड जाती मध्ये असलेल्या पारंपारिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड त्यांनी देण्याचा प्रयत्न केला.
7) किनवट परिसरात तील नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता व हक्क चळवळ त्यांनी निर्माण केल्या लोकशाहीमध्ये जागरूक मतदार नेतृत्व आणि अधिकाराची मागणी कशी करावी हे त्यांनी शिकविले गावाच्या विकास आराखड्यात लोकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला
जे नागोराव यांनी समाज हिताच्या दृष्टीने जीवन समर्पित केले आणि त्यांचे बलिदान हे किनवट इतिहासातील प्रेरणेचे स्मारक आहे.
हुतात्मा जे नागोराव प्रा संतोष गोपीचंद
किनवट हे निसर्ग संपन्न विविध आदिवासी संस्कृतींनी नटलेले आहे. अशा या भूमीत विविध समाज सुधारक राजकीय नेतृत्व उदयास आलेले आहेत त्यामध्ये नागोराव हे व्यक्तिमत्व एक आहे त्यांनी या परिसरातील शैक्षणिक राजकीय सामाजिक न्याय व्यक्तिमत्व विकास व्यापार दळणवळण प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रंत विकास व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे आणि त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा घेण्यासारखे आहे
त्यांनी केलेले कार्य किनवट परिसरातील समाजाला अंधाराकडून उजेड्याकडे नेणारे आहे. शिक्षणाचा दीप, सामाजिक समता आणि स्वाभिमान या मूल्यांचा प्रसार त्यांनी आयुष्यभर केला.
भारत देशाची राज्यघटना- प्रा. संतोष गोपीचंद पवार
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशाची राज्यघटनेचे काही कलमे लागू झाली त्यावर 384 सदस्यांनी सह्या केल्या होत्या.
आज राज्यघटनेला 76 वर्ष पूर्ण झाली असून हे 77 वर्ष सुरू आहे. मा गांधी यांच्या सत्य अहिंसा शांतता या तत्त्वावर आधारित आहे.
1) प्रेरणा
देशाला एक राज्यघटना असावी याबद्दल सर्वात प्रथम सुचले ते एम एन रॉय यांना यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील वसाहती अंतर्गत राज्यघटनेचा उल्लेख केला होता.
2)ब्रिटिशांचे कायदे
1773 रेग्युलेटिंग ऍक्ट 1884 ऍक्ट, 1813,1833, 1853 हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेले कायदे त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंट ने केलेले कायदे
1861 ज्यामुळे सर्व पहिले विधिमंडळाची निर्मिती झाली अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी निवडण्यात आले,
1891 1909 मुरली मिनटो सुधारणा कायदा यामुळे भारत देशात सर्वात पहिले आरक्षणाची सुरुवात झाली मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्यात आले.
1911 वर्षी भारत देशाची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणली.
1919 मॉन्टीक्यू जेम्स फोर्ड कायदा यामुळे द्विदल शासन पद्धती भारतात लागू झाली.1917 रोलेट अॅक्ट काळा कायदा ,
1927 सायमन कमिशन भारतात आले,
1927 नेहरू अहवाल मोतीलाल यांनी तयार केला . 26 जानेवारी 1930 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला.
1935 भारत सुधारणा कायदा हा कायदा भारत देशाच्या राज्यघटनेचा मूल आधार मानावयास हरकत नाही.
3) दुसरे महायुद्ध
एक सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने ओलांडल्यावर आक्रमण करून दुसऱ्या महाविद्यालय सुरुवात केली त्याच्या विरोधात 3 सप्टेंबरला इंग्लंड आणि फ्रान्स यांनी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली
4) कॅबिनेट मिशन
यामुळे भारत देशात चळवळ उभी राहिली या चळवळीला उत्तर म्हणून इंग्लंडचे लेबरपक्षा नेते पंतप्रधान क्लेमेट ऍटली भारतात कॅबिनेट कमिशन पाठविले.
5) घटना समिती निर्मिती
त्यांनी घटना समिती चे नाव सुचविले 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनच्या अहवालानंतर ब्रिटिश पार्लमेंट मान्यता दिली जुलै 1946 मध्ये कायदेमंडळाने संविधान सभा निर्माण करण्यासाठी निवडणूक झाल्या एकूण389. सदस्य निवडण्यात आले त्यामध्ये कायदेमंडळातून 292 (पैकी 212 काँग्रेस ,73 मुस्लिम लीग, सात इतर असे सदस्य) तर संस्थानिक मधून 92 व कमिशनर क्षेत्र यातून चार असे एकूण सदस्य होते
साधारणपणे दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता प्रत्येक प्रांताचे विभाजन हे साधारण व मुस्लिम असे करण्यात आले होते.
यामध्ये एकल संक्रमण पद्धतीनुसार मतदान घेण्यात आले
तीन जून 1947 ला पाकिस्तान साठी वेगळी संविधान सभा निर्माण करण्यात आली
त्यामुळे मूळ सदस्य घटले आणि 299 संख्या राहिली .त्यामध्ये नऊ महिला होत्या.
घटना समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष
संविधान सभेची पहिली पैठण 9 डिसेंबर 1947 रोजी दिल्ली येथे भरली यामध्ये एकूण सदस्य 209 उपस्थित होते. सदस्य हा सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आली तर उपाध्यक्ष एच. सी .मुखर्जी यांनानेमण्यात आले.
11 डिसेंबर1946 रोजी घटना समितीचे कायमचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली .
13 डिसेंबर रोजी पंडित नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली तिला संसदेने 12 जानेवारी 1947 रोजी मान्यता दिली.
. या समितीमध्ये 22 इतर समित्या होत्या प्रत्येकाला घटना निर्मितीचे काम दिले होते या सर्वांमध्ये महत्वपूर्ण
मसुदा समिती होती
ज्याची निर्मिती 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. मसुदा समिती अंतर्गत सात सदस्य होते.
1) प्रक्रिया समिती,
2) वार्ता समिती
3),संचालन समिती,
4)कार्य समिती,
5)संविधान समिती,
6) झंडा समिती ,
6)प्रारूप समिती.
मसुदा समितीमध्ये
1) एन गोपाळ स्वामी आयंगर
2)अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
3)मोहम्मद सादुल्ला
4)के. एम .मुंशी
5)डी एन मीतरयांच्या जागी एन .माधवराव
6)डी.पी खेतान यांच्या जागी कित कृष्णामाचारी होते
.बाबासाहेब आंबेडकर यांची निवडणूक
दि राष्ट्रविभाजनापूर्वी बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांत मधील जे .सौर -खोलना या मतदारसंघातून घटना समितीवर निवडून आले होते .पण बंगाल हा अर्धा प्रांत पाकिस्तान मध्ये गेल्यामुळे आपोआपच बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्यत्व रद्द झाले त्यामुळे पेच प्रसंग निर्माण झाला.
बाबासाहेब आंबेडकर जर घटना समितीमध्ये नसतील तर भारताची राज्यघटना लिहिणे शक्य नाही याची पुरेपूर जाणीव आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व घटना समिती सल्लागार बी. एन. राव यांना होती त्यांनी
बॉम्बे प्रदेशाचे मुख्यमंत्री बी .जी.खेर यांना सांगितले त्यांनी मुंबई येथील खासदार एम. आर. जयकर यांना राजीनामा देणे सांगितले त्यामुळे बॉम्बे येथील सदस्याची जागा रिकामी करण्यात झाली आणि तेथून बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर पुन्हा निवड करण्यात आली
घटनेचे एकूण वाचन तीन झाले
राज्यघटना लिहिण्यास दोन वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला म्हणजेच १०८२ दिवस लागलेत.64 लाख रुपये एकूण खर्च लागला .
लोकशाही गणराज्य समाजवाद धर्मनिरपेक्षता मानवतावाद कल्याणकारी राज्य वसुदेव कम कुटुम्बकम विश्वशांतता अशा तत्त्वांचा सार असलेली राज्यघटना देशात लागू झालेला हा दिवस आहे..
Monday, 24 November 2025
परीक्षा हॉलमध्ये स्पर्धा पेपर सोडविताना यशाचे मंत्र प्रा संतोष गोपीचंद पवार
परीक्षेत सर्वप्रथम पर्यायावर लक्ष द्या प्रचंड वेगाने संपूर्ण प्रश्नपत्रिका वरून नजर फिरवा याला
1) फोटोसन पद्धती म्हणतात जे नासातील वैज्ञानिक वापरतात स्वामी विवेकानंद यांनी देखील अभ्यास पद्धती वापरली होती.
2) पर्याय पाहताना पेन्सिलने टिक करत चला प्रथमदर्शनी पाहिलेले उत्तर हे 90 टक्के बरोबर असते
3) कारण सुरुवातीला बुद्धी प्रचंड कार्यक्षम असते.
सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता गणित चालू घडामोडी अशा विविध घटकावर विद्वानांनी
4) मागील वर्षांच्या प्रश्न काढून दिलेले असतात 100 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका बनण्यासाठी
प्रत्येक जण आपल्या विषयावरती वीस प्रश्न काढून देतो
5) त्या 20 प्रश्नाचा विचार केला तर सलग एकच पर्याय नसतो त्यामुळे शंभर प्रश्नाचे अ, ब, क, ड या पर्यायांमध्ये समांतर विभाजन असू शकते याचा देखील विचार करून सलग पर्यायाची एकच सिरीज उत्तर देऊ नये .
6) सर्वात प्रथम आपला अभ्यास यामध्ये अधिक आहे तो घटक जलद वेगाने सोडवावा
7) जो प्रश्न आपल्याला माहित नाही तो सोडविण्या मध्ये वेळ घालू नये तो शेवटीला पर्याय नुसार दोन किंवा तीन मधील पर्याय अचूक निवडा
8)जे आपल्याला प्रश्नाचे उत्तर येतात त्यामुळे आपल्या वेळेची बचत होते ते प्रश्न उत्तर लवकर प्रथम सोडवावे.
9) जे पर्याय स्पष्ट चुकीचे दिसतात ते काढून टाका उरलेल्या दोन मध्ये तथ्य सामान्य बुद्धी लावा वेगळा दिसणारा पर्याय जास्त वेळा बरोबर असतो
10) जे उत्तर जास्त सामान्य लोकप्रिय असते तेच बरोबर असते जोड्या जुळवा यामध्ये पर्याय जे 2 राहतात त्यावर लक्ष द्यायचं .
11) जी.के मध्ये अति परफेक्ट पर्याय बहुतेक चुकीचे असतात कारण तथ्य प्रश्ना जास्त खोल विचारल्या जात नाही 12) जुळणारे दोन पर्याय असतात ते दोन्ही बहुदा चुकीचे असतात
13) जो शब्द ओळखीचा त्याच्यावरच भरोसा ठेवा असेल असे म्हणून दुसरा पर्याय निवडू नका जे उत्तर लोकप्रिय असते तेच बरोबर असते
ज्ञ तीन पर्याय सारखे व एक वेगळा तोच बहुतेक वेळा बरोबर असतो
14)डोळ्यांना भिडणारा पर्याय जो नियमांशी जुळतो तोच बरोबर एखादा पर्याय सर्वात लांब असेल तर तो शक्यतो चुकीचा असतो.
15) सकारात्मक रहा तीस शकन ताठ बसून डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या म्हणजे बुद्धीला अधिक चालना मिळेल
16). 0.7 चह ब्लॅक पेन वापरा ब्लू पेन वापरू नका कारण कॅम्पुटर मध्ये एखाद्या वेळेस ब्लू पेन केलेलं डार्क हे दिसत नसते..0.5 ची पेन परीक्षेत वापरू नका कारण त्यामुळे शाईचे पेपर वर ढाक होऊ शकतात त्यामुळे पेपर खराब होऊ शकतो..
17) प्रथम गोल राऊंड उजवीकडून डावीकडे करून घ्या नंतर मधात शाईने गोल भरून घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क
8767672546
Sunday, 23 November 2025
परीक्षेला जाताना घ्यावयाची सावधगिरी.प्रा.संतोषगोपीचंदपवार
परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी या छोट्या गोष्टी त्यांना माहिती उपवाव्यात आणि परीक्षा पूर्ण यशस्वी व्हावी याकरिता काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत.
1) परीक्षेला जाताना भात ,समोसा, वडापाव ,तळलेले पदार्थखाऊ नये. त्याऐवजी चपाती भाजी, केळ , छोटे चॉकलेट, बादाम, मनुका. खावे.
2) छोटी पाण्याची बॉटल घेऊन जावी. थोड्यावेळाने पाणी थोडे थोडे पियावे. यामुळे डोक्याला ऊर्जा मिळेल.
3) परीक्षेमध्ये 0.7 बॉल पेन वापरावी.
4) परीक्षा क्रमांक ताठ बसून डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यावा.
5) परीक्षेमध्ये मान झुकून पेपर सोडू नये कारण त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होणार नाही आपली कार्यक्षमता कमी होते.
6) वस्तुनिष्ठ प्रश्न असतील तर दोन पर्याय हे बरोबर असतात सर्वप्रथम प्रश्नपत्रिका वर केवळ दृष्टी फिरवायचे असतील प्रथम जे उत्तर वाढते तेच बरोबर असतात.
7) मन शांत आणि एकाग्रता ठेवा प्रश्नावर फोकस करा.
8) एक वेळेस लिहिलेल्या उत्तर पुन्हा लिहू नका.
9) उत्तर पत्रिका आपला क्रमांक आपली साई न पर्यवेक्षकाची सायन याबाबत माहिती करून घेणे.
Monday, 17 November 2025
किनवट नगरपालिका निवडणुका. प्रा संतोष गोपीचंद पवार
किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहसीलदाराने नगरपालिका कारभार पाहण्यासाठी शरीफ वकील यांची नियुक्ती केली.
स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम येथे सन 1952 मध्ये पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या या निवडणुका तीन वर्षाकरिता होत्या . निजामाचे प्रशासक म्हणून खानदेशातून आलेले सरदार शाहमदार खान दुर्रानी यांची निवड झाली
1) त्यानंतर सन 1956 ला हैदराबाद मुन्सिपल लागू करण्यात आला त्यानुसार सलग किनवट नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून 1961 पर्यंत कार्यरत राहिले.
2) त्यानंतर श्री. एस .नर्सिंमलु सुकरवार सन 1962 ते 1964 मध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर सन 1964 ते 67 मध्ये श्री टी गोविंदराव तिरमनवार यांनी अध्यक्ष म्हणून कार्य केले.
महाराष्ट्र राज्याचा सर्वप्रथम नगरपालिका स्थानिक प्रशासनासाठी कायदा झाला तो सन 1965 मध्ये त्यानुसार किनवट पूरपालीकाही नगरपालिकेमध्ये परिवर्तित झाली. त्यानुसार प्रथमच या कायद्यानुसार निवडणुका झाल्या त्यामध्ये 1)श्री मलया मॅकलवार सन 1967 ते 1972
उपाध्यक्ष म्हणून मा खैरुद्दीन खान यांनी कार्य केले .
2)श्री .किशनराव इटकेपेल्लीवार 1973- 74
3)श्री मधुकरराव वट्टमवार 1975 -1979
(ते पहिले जनतेमधून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष होते.) 4)लक्ष्मणराव रागोलू नेमानेवार सन 1984
5)गोपाळराव नारायणराव नेम्मानिवार सण 1986
6)इसा खान सरदार खान 1991
7)निसार खान 1992
8)जगदीश मेनन 1997
9) दीपक नेमानिवार 1998
10). दिनकर बाबुराव चाडावार 1999
11) व्यंकटराव मुकुंदराव नेमानीवार 2000
12) इसाखान सरदार खान 2000 (जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले होते.)
13)अरुण लक्ष्मण आळणे 2005
14)मूर्ती यलप्पा कलगोटवार 2010
15)केवल कुमार नेमानेवार 2012
16)सुनील किशनराव पाटील 2014
17) सौ.इंदुताई शत्रुघन कनाके(2016)
( पहिल्या महिला अध्यक्षा )
18) साजिद खान निसार खान 2019
19)आनंद मच्छीवार 2019 ते 20 23
किनवट नगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत एकूण 22 वार्ड आहेत. सुरुवातीस केवळ विठ्ठल मंदिर परिसर ,वेलमापुराव, राम मंदिराचा परिसर हेच वॉर्ड होत
2025 च नगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण दहा प्रभाग आहेत त्यामध्ये 21 सदस्य निवडण्यात येणार आहेत. किनवट ची एकूण मतदार संख्या ही 25593 आहे त्यामध्ये पुरुष 12334 आहेत तर महिला 13256 आहेत. बहुमत लाडकी बहिणीकडे आहे.02/12/2025 मतदान आहे सर्व मतदारांनी जागृत राहून आपल्या किनवट शहराचा विकास करावा यासाठी विचारपूर्वक मतदान करावे आणि नगराध्यक्षपदा वर जिम्मेदार कर्तबगार उमेदवाराची निवड करावी.
Friday, 14 November 2025
वीर बिरसा मुंडा प्रेरणेचा दीपस्तंभ :प्रा. संतोष गोपीचंद पवार
आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी केलेल्या प्रचार व प्रसारामुळे आपल्या आदिवासी संस्कृती परंपरा रूढी धर्म संकटात सापडला आहे. आदिवासी समाज त्याला बळी पडू नये यासाठी आदिवासी समाजात जागृती केली. याशिवाय इंग्रज, मुसलमान मोगल निजाम या जुलमी राज्य सत्तेच्या विरोधात आदिवासी समाजाला एकत्रित करून संघर्ष करण्याचे शिकविले. त्यांचे व्यक्तिमत् संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
जन्म
15/11/1875 मध्ये ओली हा तू या गावी जि. खुंटी येथे झाला हे ठिकाण पूर्वी बिहारमध्ये होते आज झारखंड मध्ये आहे.
कुटुंब व संस्कार
वडील सुगना व आई करमी हातू मुंडा असे होते त्यांना कोरामुंडा हा भाऊ होता.
विवाह:
त्यांचा विवाह वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे सण1885 मध्ये अलमेश्वरी या मुलीशी झाला.
शिक्षण
बालपणी त्यांचा संपर्क ख्रिश्चन मिशनरी सोबत आला होता या क्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचं नाव ख्रिश्चन धर्मावर आधारित बिरसा दविद ठेवले होते .बुद्धिमान असलेल्या बिरसा मुंडा यांना त्यांचे कुटील डाव लगेच ओळखू आले ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धार्मिक साम्राज्यवादी धोरणाला विरोध केला.
मित्र
जपसाल सिंह मुंडा ,सिंधो, कानू ,संपा, जगलू
घोषवाक्य
"अबुआ दिसुम,अबुवाराज , अबुआ नियम से चलाबा" याचा अर्थ आपला देश आपले राज्य आपल्या नियमाने चालवू असा होतो.
क्रांती प्रेरणा :
ब्रिटिशांच्या अन्याय, अत्याचार आणि जुलमी व्यवस्थे व्यवस्थित विरोधा स्वय प्रेरणेने प्रेरित झाले.
सन १८९५ मध्ये त्यांनी उलगुलान म्हणजे क्रांतीची महान ज्योत पेटवली. खुंटी, तामार, सराय, केला या ब्रिटिश ठाण्यावर त्यांनी आक्रमण केले
प्रत्यक्ष संघर्ष
हा परिसर छोटा नागपूर चा आहे यापूर्वी 1895. ब्रिटिशांनी त्यांना अटक केली तुरुंगात दामले होते पुन्हा त्यांना तुरुंगातून सोडविण्यात आले होते परंतु त्यांच्या आक्रमणाच्या वाऱ्याच्या वेगाने बातम्या ब्रिटिशांच्या कानावर धडकू लागले त्यामुळे त्यांना खूप मोठ्या लष्करी संख्येने आक्रमण करावे लागले ब्रिटिश अधिकारी कॅप्टन विलीनसन आणि मेजर हिल यांच्या सैन्याशी त्यांचा सामना झाला तो डोंबारी खुंटी या ठिकाणी अतिशय रोमांचक संघर्षामध्ये बिरसा मुंडा चे सर्व साथीदार वीरगतीस प्राप्त झाले यामध्ये बिरसा मुंडा यांना ब्रिटिश सैन्याने पकडले तुरुंगवास
9 जून 19 00 हा त्यांना रांची येथील तुरुंगात सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते तुरुंगात त ब्रिटिशांच्या अत्याचाराला ते बळी पडले कॉलरा झाला असा प्रचार करून त्यांचे प्रकरण दाबण्यात आले.
आज झारखंड सरकारने या ठिकाणाला त्यांची आठवण म्हणून बिरसा मुंडा स्मारक संग्रहालय म्हणून घोषित केले तसेच यांच्या स्मरणार्थ झारखंड मुक्ती दिन हा जाहीर केलेला आहे..
स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा संतोष पवार
हातात दोन दगड घेऊन उभा राहणारा निरक्षर माणूस जेव्हा हजारोंची गर्दी जमवन त्यांच्या अंतकरणाचा ठाव घेणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा होय. एकूण 80 वर्ष आयुष्यात त्यांनी 50 वर्ष समाजाची सेवा आणि प्रबोधन कार्य केले. सुरुवातीला अज्ञानी जनतेने त्यांना हि नवले पण नंतर लगेच जनतेच्या लक्षात आले की हा व्यक्ती महान संत आहे.
्जन्म वर्ष
23 फेब्रुवारी 1876 ला झाला .
स्थळ
अमरावती जिल्ह्यातील शेणगाव मूर्तिजापर तालुका येथे झाला बाळ धाकट व गुबगुबीत असल्यामुळे त्यांना डेबू हे ठेवण्यात आले.
जात : भिल्ल
शिक्षण
त्यांचे शिक्षण कोणत्या शाळेत झाले नाही ते निरक्षर होते. अनुभवाच्या शिक्षणातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला.
आई वडील
झिंगरोजी व आई सखुबाई हे दांपत्य होते .झिंगरोजी यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्याकडे असलेली जमीन दौलत सावकाराने घेऊन टाकली त्यामुळे त्गाव सोडून त्यांना सखुबाई ने आपल्या मावस भावाकड कोतेगाव येथे आणले .तेथे झिंगरोजी दारूच्या व्यसनामुळे आरोग्य स्थिती बिघडत राहिली त्यात त्यांचा तरुण अंत झाला. त्यानंतर सखुबाई आपल्या भावाकडे आल्या मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरे या गावी आल्या
येथून आज दिबुजी यांना वैराग्याची दीक्षा मिळाली. मामाकडे 65 एकर शेती होती त्यावर सावकाराने आपला हक्क सांगितला आणि ती मामाकडून घेऊन टाकली पण डेबुजी यांच्या हुशारपणामुळे ती परत मामाकडे आले सर्व गावातील महार ,मांग ,चांभार , बहुजनांची सर्व मुलं डेबुजी यांच्यासोबत मिळून बसून जेवण करत.
प्रेरणा
समाज सुधारण्याची प्रेरणा हे त्यांना मुळातूनच होती तरी देखील संत तुकाराम ज्ञानेश्वर संत एकनाथ संत चोखामेळा अशा अनेक संत परंपरेतून गरीब जनतेवर होत असलेल्या अन्याय ,अत्याचार, शोषणा विरोधातील कळकळ यातून त्यांना समाज सुधारणा प्रेरणा मिळाली.
विवाह
सोहळा यावर्षी कुंता बाईशी झाला. संसारात रमले होते त्यांना आलोका व कलावती य दोन मुली व एक गोविंद नावाचा मुलगा होता.हे पाहून आईला खूप आनंद झाला होता. आजोबा हंबीरराव हे घरचे कर्ते पुरुष होते .
संन्याशाची भेट
सन 1904 मध्ये एका संन्याशा सोबत त्यांची भेट झाली वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी म्हणजे 19 05 ला घराचा त्याग केला बारा वर्षे सतत देशभर त्यांनी भटकंती केली टाळ, मृदंग, मंडप ,तबला ,दिवाबत्तीची जनता करत होती.
वेशभूषा:
डोक्यावर फाटकी टोपी हातात फुटलेले गाडगे ,अंगात फटका चिंध्या असलेला झबला ,धोतर, हातात काठी अशा प्रकारची त्यांची वेशभूषा होती. हातात टाळ आणि मृदंग घेऊन स्वतःच किर्तन करत होते.
प्रवास:
कधी रेल्वे बस तर कधी पायी प्रचंड प्रवास त्यांनी केलेला आहे या प्रवासात प्रत्येक गावाला ते जात होते प्रथम त्या गावाची स्वच्छता स्वतःच्या हाताने करत होते त्या मोबदल्यात ते काहीही मागत नव्हते. त्यांच्या कीर्तनामुळे ग्रामीण भागातील जनता प्रभावित होऊ लागली.
कीर्तन, प्रवचन, ढोलकी ,वादन विषय
सन 1931-40 पासून खऱ्या स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधन शिक्षण याबद्दल होते स्वतःच्या आवाजात कीर्तन करत त्यांचा आवाज खूप छान होता. कीर्तनाभारत देशात प्रसिद्ध झाले. मूर्ती पूजा नवस बळी प्रथा जातीभेद शिवाशिवी या प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला प्रत्येक कीर्तनातून हाच उपदेश लोकांना देत त्यामुळे लोकांनी त्यांच्या वर्तनावरून व निस्वार्थी आचरण व प्रतिकृती विचारे कर्मयोगी म्हणून त्यांच्या कार्याची मूल केले त्यांचा उपदेश रोजच्या जीवनाशी संबंधित होता त्यामुळे ध्यान मग्न होऊन आपले जीवन कर्म सुधारावे याचा विचार करील गाडगेबाबा आवर्जून सांगायचे* बापू हो दारू पिऊ नका"*
कर्ज काढून सन साजरी करू नका "
परोपकार करा गरिबावर दया करा
माय बापाला दूर करू नका
कोंबडे बकरी कापू नका असा सतत उपदेश करायचे. बाबाच्या कीर्तनामुळे लोक आत्मपरीक्षण करत होते.
वृद्धाश्रम समाजसेवेच्या अनेक संस्था
गावोगावी जाऊन "गोपाळा गोपाळा ,देवकीनंदन गोपाळा"असे कीर्तन करत होते. त्यांच्याकडे जमा झालेल्या संपत्तीचा वापर त्यांनी गोरगरीब दरिद्री जनतेच्या कल्याणासाठी केला त्यातून अनेक ठिकाणी समाज कल्याणकारी संस्थांची निर्मिती केली. समाजाकडून मिळालेल्या एकही पैशाचा वापर त्यांनी स्वतःच्या खर्चासाठी केला नाही.
समाधी
20 /12 /1956 रोजी दिल्ली या ठिकाणी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी त्यांनी जगाला निरोप दिला. त्यांची समाधी वालगाव, मोझरी अमरावती जिल्ह्यातील गावी आहे.
Thursday, 13 November 2025
संत फुलाजी बाबा ध्यानधारणेतून तेजस्वीपणाकडे जाणारा संत
ध्यानधारणेतून मानव सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन जगू शकतो असा संपूर्ण विश्वाला संदेश देणारे योगी म्हणजे संत फुलाजी बाबा होय. ध्यानधारणेच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशातील समाजात जागृती केली. ते एका जाती किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. तत्कालीन समाज हा अंधश्रद्धा अनिष्ट रूढी प्रथा परंपरा अज्ञान दारिद्र्य बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी त्रस्त होता या परिसरात असलेल्या आंध जमात, बंजारा समाज व बहुजन समाजाच्या जीवनामध्ये अतिशय चांगली परिवर्तन त्यांच्यामुळे घडवून आले.
जन्म
30 ऑगस्ट 1925 रोजी सावळी ता औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली झाला.
आई -वडील
त्यांचे वडील धोंडीबा इंगळे आई पुंजाबाई इंगळे हे एक शेतकरी कुटुंब होते. वडील उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशात गेले आणि तिकडेच स्थायिक झाले.
शिक्षण :
प्राथमिक शिक्षण सावळी येथे झाले. स्वयं अध्ययन अनुभव व्यावहारिक जीवन अन्यायाविरुद्ध प्रचंड प्रतिकार समाजात असलेल्या प्रथा त्याबाबत असलेले ज्ञान साधना यातून स्वयं पेरणीने शिक्षण झाले.
प्रेरणा
समाजात असलेले प्रचंड दारिद्र्य त्याचे कारण त्यामुळे शोषित समाजाला त्यातून बाहेर काढण्याची उत्स्फूर्त प्रेरणा त्यांना ध्यान धारणीतून मिळालेली आहे.
कार्य
कोणत्याही एका जाती पुरते किंवा धर्मापुरते मर्यादित स्वरूपाचे त्यांचे कोणतेही काम नव्हते. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत तसेच कच्छ ते अरुणाचल प्रदेशातील सिलचर पर्यंत त्यांचे कार्य पसरलेले होते.
ध्यानधारणा केंद्र उभारणी
250 चावर ध्यानधारणा केंद्रांची स्थापना मराठवाडा विदर्भ आंध्र प्रदेश तेलंगणा या परिसरात झालेली आहे. विदेशातून देखील यात्री भक्त तेलंगणा मधील पटनापूर मंडळ जैनुर ता उटनूरजि. आदिलाबाद येथे दर्शननासठी येतात.
संपूर्ण देशात त्यांच्या यात्रा
1)सन2008 नांदेड येथे झालेल्या शीख धर्माच्या त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने गुरुजी कार्यक्रमांमध्ये त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
2)सन 2012 मध्ये कश्मीर मधील मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांमध्ये मानव जातीच्या कल्याणा बाबत त्यांनी उपदेश दिला होता.
3)सन 2013 मध्ये पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरास त्यांनी 200 अनुयायासह भेट दिली.
शिकवण
"मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" याप्रमाणे संत फुलाजी बाबा यांनी दुःखी व पिढीत जनतेचे दुःख दूर करण्याचा मार्ग दाखविला.
1) विश्वामध्ये आपण आहोत आपल्यामध्ये विश्व आहे तोच ईश्वर आहे.
2 )प्रत्येक व्यक्तीने धनासाठी नाही तर जनासाठी कार्य करावे.
3) साधी राहणी उच्च विचारसरणी ठेवावे.
4) जातिभेद व धर्म भेद करू नाही.
5 )ध्यानधारणा हे अंतिम सत्य आहे
6 )स्वच्छ मनाने व उदात हेतूने जनमानसाची दुःख दूर करावे.
समाधी
आंध्र तेलंगणात असलेल्या उठनुर येथे त्यांची समाधी आहे.
Subscribe to:
Comments (Atom)
तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...
-
किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहस...
-
Marathwada is a Division in tof Maharashtra in India. Nanded is an important District in this Division. Nanded district has 16 talukas....
-
आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारका...