जन्म
15/11/1875 मध्ये ओली हा तू या गावी जि. खुंटी येथे झाला हे ठिकाण पूर्वी बिहारमध्ये होते आज झारखंड मध्ये आहे.
कुटुंब व संस्कार
वडील सुगना व आई करमी हातू मुंडा असे होते त्यांना कोरामुंडा हा भाऊ होता.
विवाह:
त्यांचा विवाह वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे सण1885 मध्ये अलमेश्वरी या मुलीशी झाला.
शिक्षण
बालपणी त्यांचा संपर्क ख्रिश्चन मिशनरी सोबत आला होता या क्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचं नाव ख्रिश्चन धर्मावर आधारित बिरसा दविद ठेवले होते .बुद्धिमान असलेल्या बिरसा मुंडा यांना त्यांचे कुटील डाव लगेच ओळखू आले ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धार्मिक साम्राज्यवादी धोरणाला विरोध केला.
मित्र
जपसाल सिंह मुंडा ,सिंधो, कानू ,संपा, जगलू
घोषवाक्य
"अबुआ दिसुम,अबुवाराज , अबुआ नियम से चलाबा" याचा अर्थ आपला देश आपले राज्य आपल्या नियमाने चालवू असा होतो.
क्रांती प्रेरणा :
ब्रिटिशांच्या अन्याय, अत्याचार आणि जुलमी व्यवस्थे व्यवस्थित विरोधा स्वय प्रेरणेने प्रेरित झाले.
सन १८९५ मध्ये त्यांनी उलगुलान म्हणजे क्रांतीची महान ज्योत पेटवली. खुंटी, तामार, सराय, केला या ब्रिटिश ठाण्यावर त्यांनी आक्रमण केले
प्रत्यक्ष संघर्ष
हा परिसर छोटा नागपूर चा आहे यापूर्वी 1895. ब्रिटिशांनी त्यांना अटक केली तुरुंगात दामले होते पुन्हा त्यांना तुरुंगातून सोडविण्यात आले होते परंतु त्यांच्या आक्रमणाच्या वाऱ्याच्या वेगाने बातम्या ब्रिटिशांच्या कानावर धडकू लागले त्यामुळे त्यांना खूप मोठ्या लष्करी संख्येने आक्रमण करावे लागले ब्रिटिश अधिकारी कॅप्टन विलीनसन आणि मेजर हिल यांच्या सैन्याशी त्यांचा सामना झाला तो डोंबारी खुंटी या ठिकाणी अतिशय रोमांचक संघर्षामध्ये बिरसा मुंडा चे सर्व साथीदार वीरगतीस प्राप्त झाले यामध्ये बिरसा मुंडा यांना ब्रिटिश सैन्याने पकडले तुरुंगवास
9 जून 19 00 हा त्यांना रांची येथील तुरुंगात सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते तुरुंगात त ब्रिटिशांच्या अत्याचाराला ते बळी पडले कॉलरा झाला असा प्रचार करून त्यांचे प्रकरण दाबण्यात आले.
आज झारखंड सरकारने या ठिकाणाला त्यांची आठवण म्हणून बिरसा मुंडा स्मारक संग्रहालय म्हणून घोषित केले तसेच यांच्या स्मरणार्थ झारखंड मुक्ती दिन हा जाहीर केलेला आहे..
No comments:
Post a Comment