महाराज यांचा जन्म 5 सप्टेंबर 1863 रोजी शुक्रवार या दिवशी आंध कुळा मध्ये झाला.धामणगाव हे दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ मध्ये आहे..
वडिलांचे नाव विक्रम व आईचे नाव गमाई असे होते. आजोबाचे नाव भोपाजी व आजीचे नाव साखराबाई होते. मुंगसाजी माऊली यांचे घराणे आजोबाच्या काळापासूनच श्रीमंत होते ते सर्व समाजातील कर्ज व गरीब माणसांना नेहमी मदत करत अन्नदान हे तर त्या घराण्याचे आवडते कार्य होत हीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली होती. अशातच या कुटुंबाला गरिबीचे दिवस केव्हा आले पत्ताही लागला नाही त्यामुळे मुंगसाजी महाराजांना गावातील व आपसातील काही व्यक्तीने त्रास देण्यास सुरुवात केली.
परंपरेने मुंगसाजी महाराजांकडे गावचीपाटीलकी आली होती पण काही व्यक्तींनी त्यास विरोध केला.
अशा परिस्थितीमध्ये मुंगसाजी महाराज यांनी आपल्या मालकीच्या गढी मध्ये बारा वर्षे एकाच ठिकाणी तपस्या केली विसाव्या वर्षीपासून बारा वर्षे सलग त्यांनी तप केले. तपामुळे मांडी व पोटरी एकच झाली होती
तप पूर्ण झाल्यानंतर तपासून उठल्यावर माऊलीच्या मांडीतून खूप रक्त वाहिले धामणगाव मध्ये तपा नंतरही समाजकंटक लोकांनी त्रास दिला होता.
भुकेले असलेल्या जनतेला अन्नदान करणे
कित्येक शेतकरी मजूर सामान्य नागरिक कर्जामध्ये डुबलेले असतात त्यांना कर्जमुक्त केले
कित्येकांची लग्न जुळत नव्हते त्यांचे लग्न देखील लावून दिले .
हजारो भक्तांना त्यांनी संकल्प सिद्धीने दुःखमुक्त केले त्यामुळे त्यांना महात्मा देखील म्हणण्यात आले
त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती त्यामुळे त्यांना अनेक विद्वान लोक देखील भेटण्यास येत होते
अवतार मेहेर बाबा असेच एक संत होते त्यांनी देखील .
1940 ते 45 या दरम्यान भेटतही दिल्या तसेच बडोद्याचे राजे यशवंतराव घाडगे हे त्यांनी सन 194119 47 पर्यंत सलग सहा वर्ष महाराजांची सेवा केली.
09.021947 मध्ये भगवान मुंगसाजी माऊली यांनी यशवंत घाडगे यांना बोलाविले व त्यांच्या समवेत शेगाव मूर्तिजापूर अकोला खामगाव नाशिक व मुंबादेवी च्या यात्रेमध्ये घेऊन जाण्यास सांगितले .
भगवान मुंगसाजी माऊली सन 1947 व 1952 पर्यंत 11 वर्ष मुंबईला एका जागी राहिले होते.
माऊली एकदा मुंबईला गेल्यानंतर परत धामणगावला आले नाही त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या हजारो भक्तांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली.
मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची ही माऊलींच्या नातेवाईकांनी भेट घेतली परंतु तरीही मुंगसाजी माऊलींची भेट झाली नाही.
मुंगसाजी महाराजांच्या नातेवाईकावर व त्यांच्या भक्तावर पोलीस केस करण्यात आली.
ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध राजकीय स्वातंत्र्याचा लढा चालू होता तर दुसरीकडे मुंगसाजी महाराज सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक व राजकीय असा मानवाच्या सर्व सामाजिक बंधनात अडकलेल्या मानवास त्यातल्या त्यात सर्वात जास्त बळी पडलेल्या बहुजन समाजामध्ये जागृती करण्याचे महान कार्य केले होते.
No comments:
Post a Comment